महाराष्ट्रात येणाऱ्या पालघरच्या बहाडोली जांभळाला जीआय टॅग (Geographical Indicators) मिळाला आहे. पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या गटाकडून या दिशेने प्रयत्न सुरू होते. पालघर तालुक्यातील बहडोली गावात या जांभळाचे पीक घेतले जाते. ज्याला जांभूळगाव असेही म्हणतात. या गावातील जांभूळ हे त्याच्या अनोख्या आयताकृती फळासाठी प्रसिद्ध आहे.
आता या फळाला जीआय टॅग (GI) मिळाल्यानंतर आता या फळाला अशी ओळख मिळाल्याने त्याच्या विक्रीला चालना मिळणार असल्याचे बहडोली येथील जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. ज्याची इथले लोक अनेक दशकांपासून शेती करत आहेत. टॅग मिळाल्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय मार्केटिंगही सोपे होईल. या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन जांभूळ आहे.
जांभळाची लागवड करणारे शेतकरी प्रकाश किणी म्हणाले, ‘GI’ टॅगमुळे भाव वाढण्यासही मदत होईल. डहाणू चिकूनंतर जांभूळ हे पालघर जिल्ह्यातील दुसरे फळ आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे जीआय रजिस्ट्रीने टॅग दिला. आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे..
शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद..
2018 मध्ये, बहाडोली येथील रहिवासी जगदीश पाटील यांनी जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांची संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर या फळाला जीआय टॅग मिळण्यासाठी कागदपत्रे दाखल करण्यात आली. आता पाच वर्षांनंतर जीआय टॅग मिळाल्याने शेतकरी खूश झाले आहेत. संस्थेच्या पुढाकारानेच टॅग मिळाला आहे.
बहडोलीमध्ये जांभळाची लागवड अनेक दशकांपासून केली जात आहे. येथील हजारो शेतकरी जांभळाच्या लागवडीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे आदिवासी शेतकरी आहेत. उत्पादक प्रकाश किणी यांनी सांगितले की, त्यांना जीआय टॅग मिळाल्याने खूप आनंद होत आहे. यामुळे आम्हाला बाजारात जांभळाची चांगली किंमत मिळेल आणि आता नफाही थोडा चांगला मिळू शकेल..
या जांभळाची काय आहे खासियत ?
बहाडोली जांभळाची लांबी अंदाजे 3.10 सेमी आणि रुंदी 2.87 सेमी आहे. वजन 18.32 ग्रॅम आहे. 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या जिओग्राफिकल इंडिकेशन्स जर्नलच्या अंकानुसार, विशेष मान्यता मिळालेल्या महाराष्ट्रातील नऊ फळे, कडधान्ये, भाजीपाला आणि इतरांपैकी हे एक आहे. राज्यातील विविध फळांना जीआय टॅग मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे गणेश हिंगमिरे म्हणाले की, या यादीत बदलापूर जामुनचाही समावेश आहे, परंतु या दोन्ही जातींची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आहेत..
झाडे शंभर वर्षे जुनी..
बहाडोलीमध्ये 55 हेक्टरवर जांभळाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,दोन झाडे शंभर वर्षांहून अधिक जुनी आहेत. तर इतर अनेकांचे वय 50 ते 80 च्या दरम्यान आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दोन महिन्यांच्या हंगामात शेतकऱ्यांना सरासरी 450 रुपये प्रति किलो दर मिळतो तर कधी – कधी 600 ते 700 रुपये दरानेही या जांभळाची विक्री केली जात आहे.
जीआय टॅग मिळाल्याने जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात चिकू हे फळही 5 हजार हेक्टर क्षेत्रावर घेतलं जात असून पालघरचा चिकू गोडपणा आणि उत्कृष्ट उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे 2016 मध्ये भारत सरकारने चिकूलाही राष्ट्रीय स्तरावर GI टॅग दिला..
