लोकांना फक्त कांदाच महाग वाटतो, पण तसं नाही. सध्या कांद्यापेक्षा लसूण महाग आहे. किरकोळ बाजारात लसूण 250 ते 300 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडलं आहे. मात्र भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. त्याचबरोबर महागड्या दरामुळे यंदाच्या हिवाळ्यातही लसूण खरेदी करता येत नसल्याचे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. 250 ग्रॅम लसणासाठी 60 ते 70 रुपये खर्च करावे लागत असल्याचे ग्राहक सांगत आहे.
गेल्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची पेरणी केली होती. पण, जास्त उत्पादनामुळे लसणाच्या दरात घसरण झाली होती. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा स्थितीत यावर्षी शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात लसणाची पेरणी केली. त्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत. आता नवीन लसूण बाजारात आल्यानंतर लसणाचे भाव घसरतील अशी आशा लोकांना आहे..
घाऊक लसणाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे लखनऊमधील लसूण व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही लसूण महाग झाला आहे. सध्या घाऊक बाजारात लसणाचा भाव 180 ते 220 रुपये किलो आहे. तर गतवर्षी याच काळात एक किलो लसणाचा दर 60 ते 100 रुपये होता. त्याचबरोबर आगामी काळात लसणाचे भाव आणखी वाढू शकतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण यावेळी शेतकऱ्यांनी अत्यल्प क्षेत्रात लसणाची पेरणी केली आहे. तर हिवाळा जसजसा वाढेल तसतशी त्याची मागणीही वाढणार आहे. अशा स्थितीत किमती आपोआप वाढताना दिसून येतील.
कांदा निर्यात पूर्णतः बंद..
देशात खाद्यपदार्थांच्या किमती भडकल्या आहेत. लसूणाबरोबरच कांदा, डाळी, साखर आणि गहू, मैदा, तांदूळही महाग झाले आहेत. विशेषत: कांद्याच्या वाढत्या भावाने जनता हैराण झाली आहे. 30 ते 35 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 60 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. यामुळेच केंद्र सरकारने आज 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत देशाबाहेर कांद्याची निर्यात होणार नाही..
